बस झाल यार आता
किती सेंटी कविता करू?
अन त्या बावळट प्रेमापायी
एकटाच मी किती काळ झुरु??
प्रेम वगैरे काही नाही
सगळे मनाचे खेळ असतात
कितीही उत्कट इच्छा असताना
काहिंचेच तीथे मेळ बसतात
इतर प्रेमवीर मात्र उगाचच
या जंजाळात फसतात,
नयन रम्य देखावेही याना
मग रुक्ष रुक्ष भासतात
प्रेम वगैरे म्हटल की
मुलींचे नखरेच फार असतात,
प्रेमासाठी वेडे झालेले
इथे फ़क्त मुलेच दिसतात
तेव्हा मृगजलाच्या पाठीमागे धावण्यात
वेळ उगाच घालवू नका,
अन जो प्रेम देइल तुम्हाला
त्यालाच प्रेम द्यायला शिका!
No comments:
Post a Comment