तू समोर होतीस तेव्हा मला,
बरच काही बोलायच होत,
शब्द त्याला शोधेपर्यंत
थोडस तू थांबायच होत
लिहायला घेतल तुझ्यासाठी
कवीतेतुन सगळ मांडायच होत
जेवढ़ होत प्रेम मनात
जणू कागदावर सांडायच होत
का माझ्याशी अशी वागलीस???
वीचारून तुला, भांडायच होत,
आपल्यात झाल ते आठवुन
मनमोकळे पणाने रडायच होत
बरच काही मनात असताना
औरच काही नशीबात होत
तुझ्याशिवाय जगण म्हणजे
दुःख माझ नीर्वीवाद होत
जेव्हा दूर चालली होतीस
तेव्हा मनात संगीत होत
थांब तुला म्हनाव तर
मन वीरहाच्या धुंदीत होत
No comments:
Post a Comment